रावेर – Raver – प्रतिनिधी :
शहरातील दंगलीच्या अनुषंगाने पाठवण्यात आलेल्या अशांत क्षेत्र प्रस्तावा बाबत
–
काहीच माहिती नसल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी रावेरात केले.
रावेरमध्ये मार्च महिन्यात उसळलेल्या दंगलीनंतर या दंगलीची भरपाई काढण्यासाठी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटक्के यांनी अशांत क्षेत्र घोषित करण्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता.
या नंतर श्रीमती नवटक्के यांची बदली झाल्याने पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक दोन्ही अधिकारी नव्याने जिल्ह्यात दाखल झाले आहे.नव्या अधिकाऱ्यांची काम करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी रावेर दौऱ्यावर आलेल्या पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांची पत्रकारांनी भेट घेवून,अशांत क्षेत्र प्रस्तावाबाबत विचारणा केली असता.
त्यांनी याबाबत अजून काहीच माहिती नाही.मात्र अधिकाऱ्याकडून जाणून घेणार असल्याचे यावेळी सांगत,मला कलम १४४ बद्दल माहित आहे.कर्फ्यू किंवा तत्सम कारवायाबाबत माहिती आहे मात्र काही भाग कायम अशांत असू शकत नाही असे प्रतीउत्तर दिले.