मुंबई | Mumbai
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या ३ खेळाडूंचा समावेश आहे.
- Advertisement -
धावपटू अविनाश साबळे, मल्लखांबपटू सागर ओहाळकर आणि दिव्यांग जलतरणपटू स्वप्नील पाटील यांना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.