नाशिक | दिनेश सोनवणे
आज २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस. जगाचा विचार केला तर विज्ञान विषयाकडे भारतीय विद्यार्थी खूप कमी प्रमाणात वळताना दिसतात. विद्यार्थ्यांना कमी वेळेचे शिक्षण घेऊन करीयर, सुख समृद्धी आणि बक्कळ पैसा कमवायचा आहे. अशा मनस्थितीत असलेले विद्यार्थी विज्ञानाकडे करीयर म्हणून बघताना दिसत नाहीत.
शिक्षण व्यवस्थादेखील विज्ञानातील करीयरसाठी प्राधान्यक्रम देत नाही. यामुळे विद्यार्थी इंजिनियरिंगकडे जातात. पालक आणि शिक्षकदेखील विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व पटवून देत नाही. अशा पार्श्वभूमीवर चांदवड येथील एसएनजेबी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता बाफना यांच्याशी चर्चा केली आहे. देशदूत डिजिटलचे दिनेश सोनवणे यांनी.