नगर-परळी रेल्वेला 29 कोटी 30 लाखांचा निधी

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर | Ahmednagar

अहमदनगर-बीड-परळी बैजनाथ या नवीन रेल्वे मार्गासाठी 29 कोटी 30 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे.

या रेल्वेमार्गासाठी 2826 कोटी रुपयांचा खर्च अंदाजित असून या खर्चापैकी 1413 कोटी एवढा 50 टक्के हिसा राज्य शासनाकडून केंद्रीय रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मार्गासाठी 31 मार्च 2020 पर्यंत 1398.12 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.

2020-21 साठी 149.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य शासनाने 31 मार्च 2020 पर्यंत 1169.84 कोटींचा निधी दिलेला आहे. आता 2020-21 साठी रेल्वेने केलेल्या मागणीनुसार 29.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *