बाजारपेठेचे शटर आता 7 वाजता क्लोज !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बाजारपेठेसाठी दुकाने उघडी ठेवण्याची वेळ प्रशासनाने दोन तासांनी वाढवून दिली आहे.

आजपर्यंत दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत उघडी ठेवता येत होती. मात्र 2 सप्टेंबरपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवता येणार आहेत. लॉकडाऊनच्या नवे पर्व 1 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे.

काल राज्य शासनाने काही बाबींसाठी शिथीलता दिली. त्यानंतर आज जिल्हाधिकार्‍यांनी नवी नियामवली जारी केली.

त्यानुसार जिल्ह्यातील बाजारपेठातील दुकानांना सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. दुकानांबाबत निर्णय वगळता अन्य निर्णय लागू आहेत. गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *