मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; जीवितहानी नाही

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आज ( दि. 3 )रोजी वील्लोळी नाका येथे पहावयास मिळाला. पहाटे ०५:३० वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रथम दर्शनी गाडीत काही जीवित हानी झाली तर नाही ना? असा येथील नागरिकांना संशय आला. मात्र, सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही…

सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या एम एच 15 एफ टी 2560 या गाडीने जुन्या जकात नाका समोरून वळणावर वळलेली ट्रक क्रमांक एम एच 15 ए जी 1582 तिला जोरदार ठोस दिली.

यावेळी झालेल्या अपघातात कमलाकर साळुंके, सुनील सूर्यवंशी, प्रशांत पाटील हे तिघे जखमी झाले त्यांना तत्काळ उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत अंबड पोलीस ठाण्यात कुठलीही फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.

Share This Article