Friday, April 26, 2024
Homeनगरबाजारात मोबाईल, रोकड व साहित्य लंपास करणारी टोळी जेरबंद

बाजारात मोबाईल, रोकड व साहित्य लंपास करणारी टोळी जेरबंद

कर्जत l Karjat

आठवडे बाजारात मोबाईल, रोकड व साहित्य लंपास करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे.

- Advertisement -

२४ फेब्रुवारी रोजी मिरजगाव येथील आठवडे बाजारात मिरजगावचे अखिल मेहबूब शेख (वय ५० वर्षे) हे बाजार करण्यासाठी जात होते. त्यावेळी ४ अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील ५००० रुपये किमतीचा मोबाईल, १००० रूपये रोख रक्कम व पाकीट व आधार कार्ड बळजबरीने चोरून नेले. तांबोळी यांनी २५ फेब्रुवारीला कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलीस नाईक दहिफळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रबोध हंचे, पोलीस कर्मचारी काळाने, वाघ, सरोदे यांनी आरोपीचा शोध सुरू केला होता.

गोपनीय माहितीवरून आरोपी कामेश शेटया पवार हा मिळून आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले व इतर साथीदारांची नावे व वास्त्यव्याबाबत महिती दिली. त्यावरून पोलिसांनी कामेश शेट्या पवार, नाईक टिळक भोसले, हमशेख दिलीप काळे या आरोपींना अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, अमरजीत मोरे, पोलीस जवान प्रबोध हंचे, सुरेश दहिफळे, यमगर, गणेश काळाने, संदीप वाघ, जितेंद्र सरोदे, सुनील खैरे, शाम जाधव, गोरख जाधव यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या