जळगाव – jalgaon
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर येथे शेतकर्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे.
हा बंद यशस्वी करण्यासाठी आज सोमवारी जळगाव शहरात महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. टॉवर चौकात कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यानंतर फुले मार्केटसह विविध ठिकाणी व्यापाऱ्यांसह दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले. एकंदरीत जळगावात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे.