Thursday, April 25, 2024
Homeनाशिकभुजबळांनी जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावावा

भुजबळांनी जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावावा

नाशिक । प्रतिनिधी

गेले ३९ दिवसापासून नाशिक जिल्हा बँकेच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट आज (दि .९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष संदीप जगताप व जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी घेतली.

- Advertisement -

यावेळी बोलताना जगताप म्हणाले,नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावण्यात पालकमंत्री दादा भुसे व सहकार मंत्री अतुल सावे हे अयशस्वी झाले आहेत. शेतकऱ्यांचा त्यांनी भ्रमनिरास केला. आता नवीन कॅबिनेट मंत्री झालेले छगन भुजबळ यांनी हा प्रश्न मार्गी लावावा,अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील ६२ हजार शेतकऱ्यांच्या जाचक कर्ज वसुलीच्या विरोधात अनेक वेळेस आंदोलने झालित. पालकमंत्री भुसे यांच्या घरावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा केला. या बिऱ्हाड मोर्चात नवीन ओटीएस योजना देण्याचे आश्वासन सहकार मंत्री सावे व पालकमंत्री भुसे यांनी दिले होते . परंतु,या गोष्टीला सहा महिने उलटून गेले तरी सरकारने यावर ठोस उपाययोजना केली नाही.

राजू शेट्टी व स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने अनेकदा मुख्यमंत्र्यांना भेटून त्याची वारंवार आठवण करून दिली. प्रत्येक वेळेस हा प्रश्न मार्गी लावून असा शब्द सरकारने दिला. पण तो पाळला नाही .यामध्ये पालकमंत्री भुसे व सहकार मंत्री अयशस्वी झाले. त्यामुळे गेली ३९ दिवस नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतीवाडी सोडून इथ बसण्याची वेळ आली आहे.म्हणून आता नवीन कॅबिनेट मंत्री झालेले भुजबळ यांनी हा प्रश्न मार्गी लावावा. अशी अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली. या प्रसंगी निवृत्ती गारे पाटील व आंदोलक शेतकऱ्यांचे नेते भगवान बोराडे, सागर गवळी उपस्थित होते.

छगन भुजबळ यांची प्रतिमा शेतकरी व बहुजन समाजाच्या विकासासाठी झटणारा नेता अशी आहे. नुकतेच ते मंत्रिमंडळात सहभागी झालेत. ते हेविवेट नेते आहे .नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न त्यांना चांगल्या पद्धतीने ज्ञात आहे . यापूर्वीच्या अनेक आंदोलनांमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देऊन देखील सरकारने ते पाळले नाही. म्हणून सरकारची प्रतिमा नाशिक जिल्ह्यात मलीन झाली आहे. ही प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी भुजबळ यांनी मार्ग काढावा. व नाशिक जिल्ह्यातील 62 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे,ही आमची अपेक्षा आहे.

– संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या