केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवा

jalgaon-digital
2 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा अनेकांना लाभ झालेला आहे.

या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. राज्यातील आघाडी सरकार हे या योजनांचे श्रेय घेण्याचे काम करत आहे. यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहचवून पक्षाचे काम करावे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी अ‍ॅक्टीव्ह राहून कम्युनिकेशन वाढविले पाहिजे, असे आवाहन भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी केले.

भाजप जिल्हा संघटनात्मक बैठकीसाठी संघटनमंत्री अनासपुरे आले होते. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, आ. बबनराव पाचपुते, माजी आ. शिवाजीराव कर्डिले, जिल्हा प्रभारी लक्ष्मणराव सावजी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रसाद ढोकरीकर, शाम पिंपळे, अशोक खेडकर, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शिंदे म्हणाले की, आघाडी सरकार हे सर्वच बाबतीत अपयशी ठरत असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते जनतेसमोर आणावे. यासाठी पक्षाचे संघटन मजबूत होणे आवश्यक आहे, प्रत्येक बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी क्रियाशिल राहिले पाहिजे.

जिल्हाध्यक्ष मुंडे म्हणाले, जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळली असून, याबाबत भाजपच्यावतीने आवाज उठवत आहे. यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी चांगले काम करत असून, पक्षाचे संघटन वाढविण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून संघटनमंत्री अनासपुरे यांनी जिल्ह्यातील पक्ष कार्याची माहिती घेतली.

यावेळी जिल्हा प्रभारी सावजी, माजी आ. कर्डिले व प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. बेरड आदिंनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ढोकरीकर यांनी केले तर आभार श्याम पिंपळे यांनी मानले. यावेळी शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, अशोक खेडकर, सुभाष गायकवाड, सुनीता दळवी, अनिल लांडगे, बाळासाहेब महाडिक, वसंत चेड, दादा बोठे, माणिक खेडकर, मनोज कोकाटे, अमोल भनगडे, कचरू चोथे, संतोष रायकर, विवेक नाईक, सविता लगड आदी उपस्थित होते.

राज्य सरकारचा लवकरच कार्यक्रम : शिंदे

राज्यातील सरकार हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार नाही. हे जनतेविरोधी सरकार असून ते फार काळ टिकणार नाही. लवकरच या सरकारचा कार्यक्रम होईल, असे वक्तव्य भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिंदे यांनी केले. सरकारमधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात अंतर्गत धुमसत आहेत. परंतु सध्या ते एकमेकांना सावरण्याची भूमिका घेत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *