Friday, April 26, 2024
Homeनगरलग्न लागताच नवरदेवाने जोडीने गाठले मतदान केंद्र

लग्न लागताच नवरदेवाने जोडीने गाठले मतदान केंद्र

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

अहमदनगर जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींसाठी रविारी मतदान प्रक्रिया पार पाडली. कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडली .भोजडे गावातील रहिवासी संदीप भास्कर घनघाव याचे रविवारी लग्न होते.

- Advertisement -

संदीपने लग्न लागल्यानंतर नववधू सोनमला सोबत घेऊन मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला आहे. नवरदेव नवरीला मतदान केंद्रावर पाहून उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. अनेक शिक्षीत तरून मतदानाच्या सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जातात. मात्र संदीपने विवाहाच्या दिवशीही आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचे भोजडे ग्रामस्थांनी कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या