विवाहितेचा जळाल्याने मृत्यू; घातपाताचा भावाचा आरोप

jalgaon-digital
2 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महाबळ परिसरात राहणार्‍या 53 वर्षीय विवाहितेचा (married woman) जळून (Burnt) मृत्यू (death) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात (police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु मयत विवाहितेच्या भावाने घातपातचा (Assassination) आरोप केला असून यांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जयश्री बळवंत नेरे (Jayashree Balwant Nere) (वय-53) रा. अनुराग स्टेट कॉलनी, महाबळ जळगाव, असे मयत विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयश्री नेरे (Jayashree Balwant Nere) ह्या जळालेल्या अवस्थेत आढळून आले. नेमकी आग (Fire) कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government Medical College) दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांना मयत घोषीत केले. याबाबत रामानंद नगर पोलीस (police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बाहिणीला अकस्मात आग लागलेली नसून तिच्यासोबत घातपात (Assassination) केला आहे असा आरोप मयत महिलेचा भाऊ (Brother ) सुजित जाधव (Sujit Jadhav) यांनी केला आहे. जयश्री बळवंत नेरे यांचा विवाह बळवंत नेरे यांच्याशी 25 वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यान लग्नानंतर दहावर्षांपर्यत त्यांना मुलबाळ (Children) होत नसल्याने त्यांनी भारती नावाच्या महिलेशी दुसरे लग्न (Second marriage) केले होते. पती व दुसर्‍या पत्नीसह इतरांनी तिचा छळ करून तिला जिवंत जाळले आहे असा आरोप केला आहे. तिच्या पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हा (crime) दाखल करावा अशी मागणी मयत विवाहितेचा भाऊ सुजित जाधव याने केला आहे.

पती सेवानिवृत्त कर्मचारी

मयत जयश्री नेरे यांचेे पती बळवंत नेरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन कार्यालयात (district planning office) नोकरीला होते. दीड वर्षांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *