धुळे – Dhule – प्रतिनिधी :
पत्नीच्या नावे महिला बचत गटाकडून घेतलेले कर्ज पैसे अभावी फेडता येत नाही. तसेच सध्या कामधंदा नसल्याने पैशांची गरज भासत आहे. या नैराश्यातून आर्णी ता. धुळे येथील तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश भगवान कोळी (वय30) हे मयताचे नाव आहे. प्रकाश याने त्याच्या पत्नीच्या नावे महिला बचत गटाकडून कर्ज घेतले होते. परंतू त्याला कामधंदा नसल्याने कर्ज फेडणे शक्य होत नव्हते.
या नैराश्यातून त्याने आर्णी शिवारातील शेतामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत प्रकाश विश्वास कोळी यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भावाला अटक झाल्याच्या मनस्तापातून बहिणीची आत्महत्या
अमळनेर पोलिसांनी भावाला ताब्यात घेतल्याच्या मनस्तापातून धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे राहत्या घरी फॅनला साडीने गळफास घेवून 23 वर्षीय बहिणीने आत्महत्या केली. पुजा किशोर चौधरी हे मयताचे नाव आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.