मुंबई –
महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय तपास पथकाला (सीबीआय) राज्य सरकारकडून देण्यात आलेली सामान्य संमतीची सुविधा
मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीबीआयला आता महाराष्ट्रातील प्रकरणांचा तपास करायचा असेल तर आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. यापूर्वी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सरकारने अशी भूमिका घेतली आहे.