महाविकास आघाडी सरकारकडून उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात नुकताच सादर केला.
सदर अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. शेतकर्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवेसाठी 7 हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात केलेली आहे. महिला सबलीकरणाकरिता विशेष तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे.