अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यात दिवसंदिवस लम्पी बाधितांचा आकडा वाढतांना दिसत आहे. आतापर्यंत 598 जनावरांना लम्पीची बाधा झाली असून यात 21 जनावरे मृत पावली आहेत. तर 298 जनावरांनी लम्पीवर मात केलेली आहे.
- Advertisement -
जिल्ह्यात सध्या 282 लम्पी बाधितांवर उपचार सुरू असून 646 गावातील 7 लाख 25 हजार जनावरांचे लम्पी विरोधी लसीकरण करण्यात येणार आहे.
आतापर्यत 3 लाख 58 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून 582 गावात फॉगिंग करण्यात आले आहे. जिल्ह्यात यापूर्वी लम्पी पिडीत जनावरांचे विलगीकरण करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.