Thursday, April 25, 2024
Homeनगर5 नं. साठवण तलावाला 131 कोटीची प्रशासकीय मंजुरी

5 नं. साठवण तलावाला 131 कोटीची प्रशासकीय मंजुरी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून पहिल्या दोनच महिन्यात 5 नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक स्वरूपातील खोदाई कामाला सुरुवात करून काही महिन्यातच हे काम पूर्ण देखील करून दाखविले व पुढील कामासाठी व वितरण व्यवस्थेसाठी आवश्यक असलेल्या 131.24 कोटी निधीला महाविकास आघाडी सरकारकडून प्रशासकीय मंजुरी मिळवून कोपरगाव शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखविला आहे.

- Advertisement -

संधी द्या, तुमचा पाणीप्रश्न सोडवून दाखवितो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या साक्षीने ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील विधानसभेच्या निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभेत सांगितले होते. त्या शब्दावर विश्वास ठेवून 2019 ला मतदार संघासह शहरातील सुज्ञ मतदारांनी आशुतोष काळेंना विधानसभेत पाठविले. त्यांनी पण दिलेल्या शब्द पूर्ण करण्यासाठी वारंवार शरदचंद्र पवार यांची भेट घेवून 5 नंबर साठवण तलावाला निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करीत होते. आपल्या समोर कोपरगाव शहरातील जनतेला आशुतोष काळे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली आहे. याची पक्की आठवण शरदचंद्र पवार यांना होती. त्यामुळे 5 नंबर साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांची देखील अनमोल मदत झाली असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले.

काही वर्षापासून कोपरगावच्या नागरिकांना पाणी प्रश्न भेडसावत आहे. त्याचा परिणाम शहरातील व्यवसायावर होत असल्यामुळे बाजारपेठ देखील आर्थिक अडचणीत आली होती. मात्र शहराचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर साठवण क्षमता वाढविणे व सुधारित वितरण व्यवस्था अत्यंत महत्वाची असल्याचे ना. काळेंच्या चाणाक्ष बुद्धीने हेरले होते. त्यामुळे 2019 च्या पूर्वीपासून 5 नंबर साठवण तलावासाठी त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली संधी आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासुनचा कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात ना. काळे यांना यश आले आहे. त्याबद्ल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, नगरविकास राज्य मंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचे कोपरगाव शहरातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या