Friday, April 26, 2024
Homeनगरदिल्लीच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी कचेरीसमोर ठिय्या

दिल्लीच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी कचेरीसमोर ठिय्या

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या आणि ग्राहकांची लूट करण्याच्या हेतूने कॉर्पोरेट कंपन्यांचा फायदा करून देणारे तीन जनविरोधी कृषी कायदे संसदेत पारित केले आहे.

- Advertisement -

हे कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित किसान, कामगार आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली.

यावेळी शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, बहिरनाथ वाकळे, अर्शद शेख, अशोक बाबर, महादेव पालवे, भाऊसाहेब थोटे, कॉ. महेबुब सय्यद, अंबादास दौंड, लहू लोणकर, संतोष गायकवाड, रामदास वागस्कर, दत्ताभाऊ वडवणीकर, बाळासाहेब सागडे, चंद्रकांत माळी, गणेश माळी आदि सहभागी झाले होते.

नव्याने पारित करण्यात आलेल्या शेतकरी विरोधी तीन नवीन कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे गेल्या 18 दिवसांपासून आंदोलन करीत आहे.

शेतकर्‍यांनी उपोषण सुरु केले असून या आंदोलनाची केंद्र सरकारने दखल न घेतल्यामुळे सोमवारी (दि. 14 डिसेंबर) रोजी देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन व निदर्शने केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर किसान, कामगार आणि कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या