धुळे – Dhule – प्रतिनिधी :
नाशिकहून निघालेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे आज सायंकाळी धुळ्यात आगमन झाले. या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. शेतकर्यांच्या समर्थनार्थ निघालेली ही संवाद यात्रा दिल्लीत धडकणार आहे.
- Advertisement -
केंद्रसकारने शेतकर्यांच्या विरोधात तीन काळे कायदे केल्याचा ठपका ठेवत. शेतकरी विरोधी या सरकारचा निषेध करण्यासाठी अखील भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्यावतीने ही संघर्ष संवाद यात्रा काढण्यात आली आहे.
धुळ्यात देखील सर्वपक्षीय समिती गठीत करण्यात येवून या यात्रेला पाठिंबा देतांनाच रसद पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज या समितीच्या वतीने तसेच जमियते उलेमा हिंद या संस्थेच्या वतीने यात्रेचे जोरदार स्वागत करुन पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.