Thursday, April 25, 2024
Homeनगरमुळा नदीवरील केंदळ-मानोरी पुलाचा प्रश्न मार्गी लावा

मुळा नदीवरील केंदळ-मानोरी पुलाचा प्रश्न मार्गी लावा

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी तालुक्यातील पूर्वभागातील मानोरी-केंदळ मुळा नदीवरील जीर्ण झालेल्या पुलावरून धोकादायक वाहतूक सुरूच असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ याठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा केंदळ येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

- Advertisement -

मानोरी-केंदळ खुर्द-केंदळ बृ.,चंडकापूर (ता.राहुरी) आदी गावांना जोडणारा मुळा नदीवरील बंधार्‍यासमोरील पूल हा गेल्या अनेक दिवसपासून जीर्ण झाला आहे. या पुलाची मर्यादा देखील अनेक दिवसांपासून संपलेली आहे. त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळला आहे. तर हा पूल देखील अंतिम टप्प्यात कोसळण्याच्या स्थितीत आहे.तरीदेखील या ठिकाणाहून धोकादायक वाहतूक सुरूच आहे.

त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. येथील ग्रामस्थांनी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे. तरीही अद्याप याठिकाणी नवीन पुलाची बांधणी करावी, अन्यथा आगामी काळात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सरपंच मच्छिंद्र आढाव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव, माजी सरपंच संदीप आढाव, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र आढाव, बाबासाहेब भोईटे, अनिल आढाव, पंढरीनाथ आढाव, शिवाजी गुंजाळ, शिवाजी आढाव, रामदास तोडमल, बाळासाहेब आढाव, मधुकर मगर, वैभव जरे, सचिन जरे, भाऊसाहेब आढाव आदींसह केंद्रळ खुर्द येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या