Monday, April 29, 2024
HomeUncategorizedतहसील कार्यालयात आता एजंटांना थारा नाही

तहसील कार्यालयात आता एजंटांना थारा नाही

कर्जत (प्रतिनिधी)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. मात्र, कर्जत तालुक्यात काही त्रयस्त व्यक्ती अथवा एजंट यांच्याकडून लाभार्थ्यांना प्रकरण मंजुरीचे आमिष दाखवले जात असून त्यांच्याकडून पैशाची लूट केल्याचे निदर्शनास येत आहे.

- Advertisement -

कोणी त्रयस्त व्यक्ती आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तींबाबत तहसील कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रार करावी. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिला आहे.

आगळे यांनी म्हटले आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत वृध्द, विधवा, अपंग, निराधार, परित्यक्ता, अनाथ व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत प्राप्त अर्जावर कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक घेतली जाते.

बैठकीत प्राप्त अर्जाची छाननी करून कागदपत्रांची तपासणी करून शासन निर्णयातील तरतुदीनुसार नियमांनुसार पुढील कार्यवाही केली जाते. विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थींना शासनामार्फत आर्थिक लाभ दिला जातो. यासाठी शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक फी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक पुरावे जोडून लाभार्थ्यांनी अर्ज आपले सरकार केंद्राकडे जमा करावा. जर आपले सरकार सेवा केंद्र चालक शासकीय फी व्यतिरिक्त अवास्तव रक्कम आकारत असतील तर त्यांच्याबाबत रीतसर तक्रार कार्यालयाकडे करावी, असे आगळे यांनी आवाहन केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या