Wednesday, April 24, 2024
Homeनगरएमआयडीसीसाठी उद्योगमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र

एमआयडीसीसाठी उद्योगमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या अंतिम मंजुरीसाठी मतदारसंघातील एका युवकाने चक्क स्वतःच्या रक्ताने उद्योगमंत्र्यांना पत्र लिहून कळकळीची विनंती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी मंजुरीचा मुद्दा हा चांगलाच तापला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्‍यात देखील कर्जत जामखेड एमआयडीसी मंजुरी बाबतचे फलक झळकावले होते.

- Advertisement -

आता नान्नज या गावातील अमर चाऊस या युवकाने स्वतःच्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना एमआयडीसी लवकरात लवकर मंजूर करून द्यावी यासाठी पत्र लिहिले आहे. उद्योग मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटले आहे की. उद्योगमंत्री उदय सामंत साहेब, मी एक सर्वसामान्य बेरोजगार युवक म्हणून आमच्या कर्जत जामखेड तालुक्यातील सर्व युवा व नागरिकांच्यावतीने माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आमच्या हक्काच्या एमआयडीसीला कृपा करून मंजुरी द्या आणि आमच्या हाताला काम मिळू द्या.

आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा आणि गंभीर परिस्थितीचा विचार करून रोहितदादांच्या एमआयडीसीबाबतीतच्या मागणीला मान्य करा एवढीच कळकळीची विनंती. या पत्राची सर्वत्र चर्चा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या