पारनेर |प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील कान्हुर पठार उपकेंद्रातंर्गत येणार्या किन्ही , बहिरोबावाडी , तिखोल या गावांमधील कृषीपंपांचे थकीत विजबील वसुलीसाठी महावितरणने विजपुरवठा खंडित केल्याने सोमवारी संतप्त शेतकर्यांनी कान्हुर पठार येथिल महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तीन तास ठिय्या आंदोलन केले.
या वेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील व आंदोलक शेतकर्यांनी मागील काही दिवसांपासून शेतीसाठी सुरळीत व पुर्ण क्षमतेने विजपुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे असा संतप्त सवाल उपस्थित केला. तसेच यापुढे सुरळीत व अखंडितपणे विजपुरवठा न मिळाल्यास एकही शेतकरी वीजबिल भरणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या वेळी किन्हीचे उपसरपंच हरेराम खोडदे , माजी सरपंच मानसिंग देशमुख , किसन खोडदे , माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे, बापु व्यवहारे ,राजाराम देठे पाटील,यशवंत व्यवहारे, संजय खोडदे, सखाराम खोडदे , मारूती सावंत , गंगाधर देठे पाटील , जयसिंग खोडदे, बाबासाहेब व्यवहारे ,संदिप खोडदे , संपत खोडदे , अशोक खोडदे मेजर ,सुभाष खोडदे , साहेबराव खोडदे , संजय खोडदे , रामभाऊ साकुरे , दत्ताञय साकुरे , भारत ठाणगे , रामदास देठे , भानुदास देठे , संग्राम खोडदे , मोहन मोढवे , किरण व्यवहारे , दादाभाऊ मोढवे , संतोष व्यवहारे , सुभाष मोढवे , सुनील खोडदे , अशोक खेसे , नितीन खोडदे , प्रताप खोडदे , चेतन पवार , विनोद खोडदे ,अनिल खोडदे आदि उपस्थित होते.
किन्ही, बहिरोबावाडी, तिखोल या गावांमधील कृषीपंपांना सुरळीत व पुर्ण क्षमतेने विजपुरवठा मिळाल्यास शेतकरी वीजबिल भरतील परंतु महावितरण कंपनीने देखील वारंवार खंडित होणार्या विजेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा शेतकर्यांसह पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– अनिल देठे पाटील, शेतकरी नेते