Friday, April 26, 2024
Homeनगरनगरपरिषदेने पाणीपट्टी व घरपट्टी माफ करून दिलासा द्यावा - खैरे

नगरपरिषदेने पाणीपट्टी व घरपट्टी माफ करून दिलासा द्यावा – खैरे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

नगरपालिकेने शहरातील नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून दिलासा द्यावा, अशी मागणी

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीचे कोपरगाव शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यापूर्वी तहसीलदार, मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद यांना निवेदन देऊन माहे एप्रिल, मे आणि जून 2020 महिन्याची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी केली होती, सुमारे चार महिन्यांपूर्वी मागणी करूनही नगरपालिकेकडून अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही.

दिवसेंदिवस करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोपरगाव शहरातही रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आजही कोपरगाव शहरातील बाजारपेठ, दैनंदिन व्यवहार सुरळीत झालेले नाही, रोजगार उद्योगधंदे ठप्प झाल्याने सर्व नागरिक, व्यापारी, गोरगरीब, छोटे व्यावसायिक, मध्यमवर्गीय तसेच हातावर पोट भरणार्‍या नागरिकांना जीवन जगणे अवघड झाले आहे.

या कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करताना जीवन मरणाच्या अवस्थेतून नागरिक जात आहे, याही परिस्थितीत कोपरगाव नगरपरिषदेच्या करनिर्धारण विभागाकडून नागरिकांना कराचे बील वाटपाचा कार्यक्रम सुरू झाल्यामुळेे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील जुलै, ऑगस्ट महिन्यातही करोनाच्या परिस्थितीमुळे व्यावसायांवर परिणाम झाल्याने आर्थीक आवक मंदावली, त्यामुळे माहे एप्रिल ते ऑगस्ट 2020 अखेर नगरपरिषदेची घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणीही श्री.खैरे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या