जलयुक्त शिवार योजनेची चौकशी : पंकजा मुंडे म्हणाल्या…

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई –

फडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेतील गैरकारभाराबाबत

कॅगने ताशेरे ओढल्यानंतर एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना पंकजा मुंडे यांनी चौकशी लावावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे असं म्हटलं.

पंकजा मुंडे यांनी म्हटलं, जलयुक्त शिवार योजनेचा उद्धेश अत्यंत चांगला आणि लोकहिताचा आहे. चौकशी लावावी की नाही हा राज्य सरकारचा प्रश्न आहे. बीडमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा याचा किती फायदा झाला की हे लोकांना माहिती आहे. ही लोकांची योजना आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *