Saturday, April 27, 2024
Homeजळगावमुंबईतून आलेल्या ‘त्या’ 30 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

मुंबईतून आलेल्या ‘त्या’ 30 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

दुचाकी खरेदी केल्यानंतर ती रस्त्यावर आणण्यापूर्वी त्याची तात्पुरती नोंदणी करणे आवश्यक असते. मात्र, या नियमाला फाटा देत तात्पुरती नोंदणी न करता विना कागदपत्रे 30 नवीन दुचाकी शुक्रवारी मुंबईतून जळगाव शहरात दाखल झाल्या.

- Advertisement -

याविषयी शहरातील अधिकृत वाहन कंपन्यांच्या डिलर्सने तक्रार केल्यानंतर दुपारी एमआयडीसी पोलिसांनी त्या तीस दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत असून चौकशीअंती कारवाई केली जाणार आहे.

मुंबईतून जळगावात काही माल ट्रकांमधून नवीन दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती किरण बच्छाव, टीव्हीएस कंपनीचे योगेश चौधरी, होंडी कंपनीचे प्रकाश जाखेटे यांना मिळाली होती.

त्यांनी शुक्रवारी दीड वाजेच्या सुमारा अजिंठा चौफुली एमएच.48.एजी.0426 या क्रमांकाचा आयशर ट्रक थांबविला असता, त्यामध्ये तीस नवीन दुचाकी दिसून आल्या. तिघांनी आयशर ट्रकचालक गुरूप्रसाद मिश्रा याला डिलीव्हरी चलन आहे का? अशी विचारणा केली.

त्यावर त्याने नकार दिला व भिवंडीतून दुचाकी आणल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे शहरात अधिकृत डिलर्स असताना बाहेरून परस्पर विक्रीला दुचाकी आल्या कशा? असा सवाल उपस्थित करीत किरण बच्छाव यांनी एमआयडीसी पोलिसात चौकशीसाठी अर्ज दिला़ त्यानुसार पोलिसांनी आयशर ट्रकची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यात 28 लाख 16 हजार 450 रूपयांच्या तीस नवीन मोटारसायकली आढळून आल्या. अखेर संपूर्ण चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांनी त्या नवीन तीस दुचाकी जप्त केल्या आहेत.

मोठे रॅकेट असल्याची शक्यता

शहरातील शोरूमपेक्षा कमी किंमतीत दुचाकी मिळत असल्यामुळे त्या बुकींग करण्यात आल्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, कमी किमंतीत दुचाकी विक्री झाल्यास शहरातील अधिकृत डिलर्स यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. याप्रकरणात मोठे रॅकेट असल्याची शक्यता असून याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या