Friday, May 10, 2024
Homeनगरनगरचे नामांतर ‘आनंदनगर’ करावे

नगरचे नामांतर ‘आनंदनगर’ करावे

अहमदनगर (प्रतिनिधी)

अहमदनगर शहराच्या नामांतराची चर्चा सुरू असून नगरमधील जैन समाजाने नगरचे नाव ‘आनंदनगर’ करावे अशी मागणी केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे.

- Advertisement -

लवकरच नगरमधील जैन समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून आपली मागणी मांडणार असल्याची माहिती जितो अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा यांनी दिली.

राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांची जन्मभूमी, तपोभूमी तसेच कर्मभूमी म्हणून नगरची संपूर्ण देशात ओळख आहे. आचार्यश्रींचे समाधीस्थळ असलेले आनंदधाम हे देशभरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. मानवतेचा महान संदेश आचार्यश्रींनी दिला आहे, त्यामुळे नगरचे नामकरण आनंदनगर करणे अतिशय उचित होईल, असा आग्रह होत आहे, असे मुथा यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या