उपसा जलसिंचन योजना थकीत कर्जावरील व्याज माफ करा

jalgaon-digital
2 Min Read

भेंडा l वार्ताहर l Bhenda

आजपर्यंत कोणत्याही कर्जमाफीत न बसलेल्या उपसा जलसिंचन योजनेतील थकीत शेतकऱ्यांचे व्याज माफ करावे अशी मागणी

नेवासा तालुका किसान सभेने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालकांकडे केली.

जिल्हा सहकारी बँकेच्या कार्यकारी संचालकांना पाठविलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य किसान सभा नेवासा तालुका शाखेने म्हंटले आहे की, आज पर्यंत केंद्र तसेच राज्य सरकारने अनेक वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली.

परंतु काही शेतकरी एकाही कर्जमाफी मध्ये बसलेले नाही विशेषतः उपसा जलसिंचन योजनेसाठी गाव पातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीकडून मध्यम मुदत कर्ज थकीत शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी एकरी 4 ते 5 हजार रुपये कर्ज घेतले होते. त्याचे आज व्याजासह मुद्दलाच्या चार ते पाच पट रक्कम झाली आहे.

कायद्यानुसार कर्जाच्या मुद्दलाच्या दुप्पट व्याज घेता येत नाही. परंतु आपली बँक मात्र सर्व व्याज वसूल करत आहे. हे बेकायदेशीर आहे राष्ट्रीयकृत बँका थकीत कर्जदाराचे फक्त मुद्दल वसूल करून ओटीएस करत आहेत.

आपली शेतकऱ्याची बँक असूनही शेतकऱ्याकडून चौपट पाचपट व्याज वसूल करत आहे. त्यामुळे बँकेने धोरणात्मक निर्णय घेऊन थकीत कर्जदारांचे सर्व व्याज माफ करावे. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असे ही म्हंटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, सहकार मंत्री, जिल्हा बँकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, बँकेचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडूरंग अभंग, बँकेचे भेंडा शाखाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर यांना पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदनावर नेवासा किसान सभेचे सचिव कॉ. भारत आरगडे, जिल्हा सचिव कॉ. आप्पासाहेब वाबळे, कॉ. गोरक्षनाथ आरगडे, कॉ. बंडू आरगडे, कॉ. बाबासाहेब जावळे यांच्या सह्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *