Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकग्रामपंचायत निवडणुकीवर सोशल मीडियाचा प्रभाव

ग्रामपंचायत निवडणुकीवर सोशल मीडियाचा प्रभाव

ओझे । विलास ढाकणे

दिंडोरी तालुक्यात साठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गावा-गावात वातावरण हळूहळू तापू लागले आहे.

- Advertisement -

गावामधील व्हाट्सअप ग्रुप वर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले पाटोदा गावाचे सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्या भाषणाचे व निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचे व्हिडिओ व चित्रफिती पाठवून गावाचा सरपंच कसा असावा यासंदर्भात जनजागृती केली जात असल्यांचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यातील प्रत्येक गावात प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सगळ्याच इच्छुकांचे डोळे सरपंच पदाच्या सोडतीकडे लागले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या नवीन आदेशानुसार सरपंच पदाचे आरक्षण आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या नंतर ठेवण्यात आलेले आहे. त्यांमुळे सरपंचपदाच्या रेसमध्ये असणा-यां उमेदवाराची निराशा झाली आहे.

दिंडोरी तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायती या आरक्षित असल्याने फार थोड्याच ग्रामपंचायती मध्ये सरपंचपद हे सर्वसाधारण वर्गासाठी खुले होणार आहे. मात्र सरपंचपद हे कायम आरक्षित असणार्‍या ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी चुरस पाहायला मिळत आहे. दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद हे वर्षानुवर्ष आरक्षित असल्यामुळे या गावामधील निवडणूक ही उपसरपंच पदासाठी कायमच प्रतिष्ठेची होत असते.

या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच सर्वसाधारण खुल्या वर्गातील व्यकतीला राजीखुशीने दिले जाते. परंतु आता या उपसरपंच पदासाठी काही गावामध्ये मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे. अनेक गावामध्ये विकासाचा मुद्दा समोर येत आहे. अनेक गावामध्ये पददीपावर मोठ्या प्रमाणावर खर्च पाहावयास मिळत आहे. काही गावामध्ये मुरूम टाकण्यासाठी लाखोचा निधी खर्च झाल्याचे पाहण्यास मिळत आहे तर काही गावामध्ये स्वातंत्र्यानंतर आता कुठे तरी विकासाला सुरुवात झाल्यांचे समोर येत आहे.

त्यामुळे आतापर्यत विकासकामे का झाली नाही असा मुद्दा समोर येत आहे तर अनेक ग्रामपंचायतीना उत्पन्नाचे कुठेही साधन नसल्यामुळे पेसा व 14 वित्त आयोग यावरच अवलंबून राहवे लागते. घरपट्टी, पाणीपट्टी नागरिक वेळेवर भरत नाही. अनेक लोक हे मळ्यात राहत असल्यामुळे त्यांना तर आपल्याही घरपट्टी भरावी लागते हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस माहित होत आहे. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

त्यामुळे गाव पातळीवर निवडणुकीचे अनेक किस्से ऐकण्यास मिळत आहे. सध्या तरी ग्रामपंचायत निवडणूक असणार्‍या गावामध्ये व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर राज्यातील नामवंत सरपंच भास्करराव पेरे- पाटील व निवृती महाराज इंदोरीकर यांचे ग्रामपंचायत विकासासंदर्भात अनेक व्हिडिओ व संभाषणाच्या चित्रफिती व्हायरल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीला चांगलाच रंग भरला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या