भारताने मालिका जिंकली

jalgaon-digital
1 Min Read

पुणे –

इंग्लंड विरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला 7 धावांनी नमवत मालिका 2-1 अशी नावावर

केली. नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे इंग्लंडसमोर 330 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 322 धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर सॅम करन भारतासमोर उभा राहिला. त्याने नाबाद 95 धावा करत टीम इंडियाचे टेंशन वाढवले, मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात 14 धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने अप्रतिम गोलंदाजी करत या षटकात अवघ्या 6 धावा दिल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *