Thursday, April 25, 2024
Homeनगरअधिक खोल बोर घेण्याची स्पर्धा भविष्यात अडचणीची ठरेल - उपेंद्र धोंडे

अधिक खोल बोर घेण्याची स्पर्धा भविष्यात अडचणीची ठरेल – उपेंद्र धोंडे

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

दोनशे फुट खोल कुपनलिका घेतली तर त्याचा रिचार्ज (भूजल पुनर्भरण) अधिक चांगला होतो. अज्ञानपणा असल्याने अधिक खोल बोर घेण्याची चाललेली स्पर्धा भविष्यात अडचणीची ठरेल असे सांगून भुगर्भ कोरडा होवू नये याकरीता यापुढे सतत समग्र सामूहिक कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिसाद सहज जलबोध अभियानचे प्रमुख व केंद्रीय भूजल मंडलचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी केले.

- Advertisement -

भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, अहमदनगर व नेवासा तालुका पत्रकार एकता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाणी बचत काळाची गरज व जलसाक्षरता’ या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.यामध्ये पत्रकारांबरोबरच अनेक सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या ऑनलाईन कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी केंद्रीय भुजल मंडलाचे वरीष्ठ भुजलवैज्ञानिक उपेंद्र धोंडे होते.

पत्रकार एकता संघाचे अध्यक्ष सुनिल गर्जे यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले.पत्रकार-जलमित्र सुखदेव फुलारी यांनी ऑनलाईन कार्यशाळा बाबत माहिती दिली.

नगरच्या भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्र.वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी प्रास्ताविक भाषणात जिल्ह्यात भुजलचे सुरु असलेले काम व भविष्यातील आवश्यक बाबी विषद करून जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 80 पाणलोट क्षेत्रापैकी 15 अतिशोषित,14 अंशतः शोषित,47 पाणलोट क्षेत्र सुरक्षित असल्याची माहिती दिली.

भुजल विकास यंत्रणाचे कनिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी सर्व सहभागी पत्रकार व इतरांना माहीतीपट दाखवून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

ऑनलाईन कार्यशाळेच्या चर्चेत एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल गर्जे,माजी अध्यक्ष विनायक दरंदले,जेष्ठ पत्रकार सुखदेव फुलारी,कारभारी गरड,सोमनाथ कचरे,दादासाहेब निकम,सीना भुजल व्यवस्थापन(डोंगरगण)चे अध्यक्ष कैलास पठारे यांनी भाग घेतला.बाळकृष्ण पुरोहित,शंकर नाबदे,सुहास पठाडे,अशोक पेहरकर,ग्रामीण संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे,राजेंद्र वाघमारे,अदिनाथ म्हस्के,

संतोष सोनवणे,सुधाकर होंडे,विकास बर्डे, राहुल कोळसे,गणेश दारकुंडे,दिनेश दिक्षीत,गोरक्षनाथ सावंत,अनिल रोडे,दिलीप तावरे ज्ञानदेव बाबर,शशी पवार,प्रकाश आघाव सहभागी झाले होते.

उपस्थित पत्रकारांनी अनेक गावातील पुरातन बारव व वहिरी गायब करुन अतिक्रमण होत आहे.,गावात कुपनलिका घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीजवळ खाजगी कुपनलिका घेता येते का.नेवासा तालुक्यातून मुळा, प्रवरा व गोदावरी नदी वाहते,तालुक्यात मागील वर्षी 1000 मिमी पाऊस पडला असूनही पावसाळ्यापुर्वी पाण्याची अडचण येते,60 मीटर पेक्षा जास्त खोलीचे बोअर न घेण्याचा कायदा कोणीच पाळत नाही,यासह भुजल कायदा व आवश्यक उपाययोजना बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

सहज जलबोध अभियानचे प्रमुख उपेंद्र धोंडे यांनी सन 2018 मध्ये आंबेगाव,जुन्नर, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील काही गावात राबवलेल्या अभियानचा मोठा फायदा होत असल्याचे सांगितले. भुगर्भ कोरडा होवू नये याकरीता यापुढे सतत समग्र कार्य करणे आवश्यक आहे असे सांगितले.

भुजल सर्वेक्षण च्या प्रवरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम व कनिष्ठ भुवैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. बाळकृष्ण पुरोहित यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या