Saturday, April 27, 2024
Homeनगरभविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन गरजेचे

भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन गरजेचे

अहमदनगर (प्रतिनिधी) –

लोकसभेचे सभापती यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमानिमित्त गतवर्षी पदम पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींचे

- Advertisement -

मार्गदर्शन देशातील खासदारांना देण्यात आले. या ऑनलाईन कार्यशाळेत शुक्रवारी पद्मश्री पोपटराव पवार यांनी देशातील खासदारांना ग्रामविकासावर मार्गदर्शन केले. त्यावेळी पवार पुढे बोलताना म्हणाले, देशासमोरील भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन व पिक नियोजनाची अत्यंत गरज आहे.

देशातील 15 राज्यात भीषण पाणीटंचाई असून 52 टक्के भूभाग हा अवर्षणप्रवण क्षेत्रात आहे. विहिरीद्वारे होणारे सिंचन हे वरच्या भूस्तरातून होते.आपण आता खोलवरच्या भूस्तरातून(बोअरवेलद्वारे) पाणी उपसा करत असून परिणामी दरवर्षी 30 ते 40 हजार बोअरवेल कोरडे पडत आहेत तर भविष्यकाळात वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

सर्वात सुपीक असा भूभाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंजाबच्या मातीने भारताची भूक भागविली तिथेसुध्दा 300 ते 400 फुट खोलवर गेल्याशिवाय पाणी मिळत नाही. त्याचबरोबर राजस्थान, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, ओरिसा या भागातसुद्धा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वात मोठे आव्हान येत आहे. म्हणून हिवरे बाजारच्या प्रयोगातून भूजल व्यवस्थापन व पिक नियोजनातून हिरवेगार, पाणीदार, निर्व्यसनी गाव निर्माण झालेले आपल्याला पहायला मिळत आहे.

समृद्धीच्या मागे चंगळवाद व व्यसनाधीनता येऊ नये यासाठी तरुणाईला संस्कारक्षम बनविण्याची विशेष गरज आहे अन्यथा व्यसनाधीन कुटुंब व व्यसनाधीन गावे राष्ट्रासमोर सर्वात मोठे आव्हान असेल. संस्कार देण्याची शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.

भारतीय संस्कृतीतील संतसाहित्य अभ्यासक्रमात व आचरणात येणे गरजेचे आहे.आर्थिक क्षमत नसलेल्या घटकांसाठी सरकारी व्यस्था आहे परंतु ती व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे अन्यथा खाजगीकरणातून नवी विषमता निर्माण होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या