नाशिक | Nashik
जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने सुरुवात केली असून शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
- Advertisement -
दरम्यान दीड महिना गायब असलेला पाऊस गेल्या दोन दिवसांपासून बरसत आहे. यामुळे लागवड केलेली पिके बहरू लागली आहेत. नदी, नाले वाहणयास सुरुवात झाली आहे. तर अनेक तलावातील पाणी पातळी वाढत आहे.
जिल्हयातील त्र्यंबक, दिंडोरी, पेठ परीसरात भाताची लागवड जोरदार करण्यात आली होती. परंतु पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. परंतु आता पावसाची संततधार चालू असल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर अनेक भागात रखडलेली भात आवणीला सुरवात झाली आहे.