अहमदनगर (प्रतिनिधी) –
ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या महिला उमेदवाराचे निवडणुकीच्या निकालापूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नगर तालुक्यातील
- Advertisement -
विळद येथील यमुनाबाई बाळासाहेब शिंदे (वय 65) यांचे शनिवारी (16 जानेवारी) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. त्या विळद ग्रामपंचायत निवडणुकीसाठी संघर्ष पॅनेलमधून वॉर्ड क्रमांक 4च्या उमेदवार होत्या. येत्या सोमवारी (18 जानेवारी) निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याअगोदरच त्यांचे निधन झाले आहे.