वीरगाव | वार्ताहर | Virgoan
अकोले तालुक्यातील विरगाव येथे सणासुदीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे.
शेततळ्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या सावलीला अभ्यास करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय दहावीच्या मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे.
ही घटना आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. यात आश्वीनी कृष्णांगर थोरात (वय 16) व कृष्णांगर जगन्नाथ थोरात (वय 45, दोघे रा. विरगाव, ता. अकोले, जि. अ.नगर) असे मयत झालेल्या दोघांची नावे आहेत.
आश्विनी ही दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. उन्हाळ्याच्या मार्च मधील उष्णतेची दाहकता वाढत चालल्यामुळे घरात गरम होत होते. म्हणून शेतात थंड वातावरण शोधून ही विद्यार्थीनी अभ्यास करत होती.
गोदावरी नदीपात्रातून मोठ्या यंत्राने वाळू उपसा
मात्र, या दरम्यान तिचा शेततळ्याच्या कागदाहुन पाय घसरला आणि ती अगदी कोपऱ्यावरच घसरली. तिने शेततळ्याचा कागद धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते शक्य झाले नाही म्हणून तीने जोरजोराने आरडायला सुरूवात केली.
आपल्या मुलीचा आवाज येत असल्याचे तिच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी हातातले काम टाकून थेट शेततळ्याकडे धाव घेतली. तिला वाचविण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना देखील मृत्युला सामोरे जावे लागले आहे.