शेतकरी संघटनांचा अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर मोर्चा – राजू शेट्टी

jalgaon-digital
6 Min Read

पुणे (प्रतिनिधी) –

दिल्ली येथे सुरू असलेले अभूतपूर्व व ऐतिहासिक शेतकरी आंदोलन आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करते आहे केंद्र सरकारला हे आंदोलन मोडून काढण्यासाठी

केंद्र सरकार सर्व हातखंडे वापरूनही यश मिळत नाही म्हटल्याने आता आक्रमकपणे या आंदोलनाची बदनामी सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि म्हणून दिनांक २२ डिसेंबर रोजी मुंबई येथील अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष व लोक संघर्ष मोर्चा हे एकत्रित मोर्चा काढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला पाठींबा असलेल्या संघटना या मोर्चात सामील झाल्या तर आमची हरकत नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला हमाल पंचायतचे नेते बाबा आढाव, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, या आंदोलनाला ज्या संघटना व पक्ष पाठींबा देत आहेत त्यांना लक्ष करून पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांच्या विरोधी षडयंत्र केले जात असल्याचा आरोप करीत आहेत तर भाजपाचे खासदार व प्रमुख नेते बेताल वक्तव्य करत शेतकरी कायदे है कसे शेतकरयांना तापदायक आहेत हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत म्हणून आता या देशातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या संघटणांनी केंद्रसरकारच्या या हुकूमशाही अरेरावीला रस्त्यावर उतरून उत्तर देण्याची वेळ आली आहे.

दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी घेतलेले आक्षेप हे केवळ शेती आणि शेतकरी यांच्या हितापूरतेच मर्यादित नाहीत तर या देशातीत संसदीय निर्णय प्रक्रिया, संघराज्य प्रणालीवर केलेत आक्रमण, मूठभर उद्योगपतींना पूर्वतयारी करायला लावून त्यांच्या हितासाठी कायदे करण्याची घाई व त्यांच्या साठी बनवलेल्या कायद्यांना जनता,जनसंघटना आणि विरोधी पक्षांनी विरोध केला तर त्यांना देशद्रोही, अतिरेकी, नक्षली, आणि राजकीय हेतूनी प्रेरित संबोधून दडपशाही करण्याची रणनीती हा सर्व खेळ आता जनतेपुढे उघड झाला आहे आणि त्यामुळे देशाच्या सर्वच स्तरातून या आंदोलनाला पाठींबा वाढत चालला आहे आणि त्यामुळे भाजपा सरकार गडबडून गेले आहे

हे आंदोलन केवळ पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचे नाही महाराष्ट्रातील शेतकरीही त्यात सहभागी आहे हे 26 नोव्हेंबर ला सर्व तहसील कार्यालयांवर झालेली निदर्शने 8 डिसेंबर ला केलेला भारतबंद आणि आता 14 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयांवर झालेती निदर्शने व अन्नत्याग आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. परंतु, जर रस्त्यावर उतरून दाखवते ती विधायक ताकदच जर केंद्र सरकारला कळत असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष व लोक संघर्ष मोर्चा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील शेतकरी कोरोनाचा काळ लक्षात घेऊन प्रातिनिधिक स्वरूपातच परंतु केंद्र शासनाला धडकी भरेल अश्या भव्य संख्येने दि 22 डिसेंबरला मंगळवार रोजी मुंबईत धडकणार आहेत. महाराष्ट्रातील अजून संघटनाही यात सहभागी होतील.

आमची प्रमुख मागणी शेतकरी विरोधी तिन्ही कायदे प्रस्तावित वीज बिल विधेयक हे तात्काळ रद्द व्हावेत हीच आहे त्याच बरोबर आम्ही दिल्लीतील शेतकरी आंदोलनासोबत आहोत व हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर गंभीर परिणाम केंद्र सरकारला भोगावे लागतील हा इशारा देण्यासाठीही असेल. केंद्र सरकारकडे शेतकरयांना या कायद्याचे फायदे काय हे सांगण्यासाठी कुठलेही ठोस मुद्दे नाहीत म्हणून मोदी व त्यांचे सर्व मंत्री मिडीयाला हाताशी धरून पुन्हा पुन्हा तीच खोटी विधाने करीत आहेत msp चालूच राहणार हे सांगताना ते या msp ला कायद्याचे संरक्षण देणार का यावर मात्र उत्तर देत नाहीत. शेतकऱ्याला पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करून देत त्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा बोलली जाते मात्र, यात जर तुम्हाला शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची भूमिका आहे त्याची काळजी आहे तर मग त्याला चढ्या भावात खरेदी करावे लागणारे बियाणे, खते, औषधे, विजबिल, सिंचन यावर त्याला संरक्षण देणारे कायदे का बनवत नाहीत आज जे कंपन्यांच्या हिताचे कायदे आहेत त्यात दुरुस्ती करून शेतकऱ्यांना संरक्षण का देत नाहीत यावर मात्र सरकार उत्तर देत नाही आणि हे तिन्ही कायदे देश लॉकडाऊन असताना ज्या पद्धतीने मंजूर केले गेलेत तेव्हाच का नाही शेतकऱ्यांना विचारले गेले त्यामुळे या कायदे करण्यामागची भूमिका उद्योगपतींच्या हातात शेतीव्यवसाय सोपवून छोट्या शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर हुसकावून लावण्याची आहे हे स्पष्ट आहे आणि म्हणून हे कायदे रद्द केल्याशिवाय आता हा शेतकरी आंदोलनाचा वणवा शांत होणार नाही केंद्र सरकारने दडपशाहीचा वापर केला तर त्याचा देशभर अधिकच तीव्र भडका उडेल याची नोंद केंद्र सरकारने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

यासोबतच ज्या अंबानी अडाणी सारख्या भांडवलशाही घराण्यांच्या फायदा साठी हे शेतकरी विरोधी कृषी कायदे आणले गेलेत त्यांनाही आम्ही इशारा देत आहोत की आत्ता शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमेवरून जिओ वर बहिष्कार करण्याचा जो कॉल दिला तो आमलात आणत लाखो लोकांनी जिओ वर बहिष्कार टाकला आहे आणि ही मोहीम अधिक तेज करण्याची व अडाणी अंबानी यांच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकण्यात यावा असे अपील व आवाहन शेट्टी यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले.

बाबा आढाव म्हणाले, आमचा राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठींबा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदा शहरी मंडळी शेतकऱ्यांबरोबर असल्याचे चित्र आहे. केवळ बरोबर नव्हे तर ते कृतीतून बरोबर आहेत. केंद्र शासन शेतकऱ्यांना सांगते की आम्ही तुम्हाला मोकळं केले. परंतु, सरकारने स्वत:ची जबाबदारी टाळली आहे. सर्व क्षेत्रातील लोक सांगत असतानाही ऐकायला तयार नाही. दुनिया काय म्हणते आहे हे जरा मोदींनी ऐकावे असा टोला त्यांनी लगावला. केवळ शब्दांचा खेळ सुरु आहे. सरकार तपशिलात बोलायला तयार नाही. कोणाला विचारायला तयार नाही. त्यामुळे आमच्या अडचणी वाढत आहेत. दोष केवळ कायद्यांचा नाही तर तुमच्या नाकर्तेपणाचा आहे अशी टीका त्यांनी केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *