शेतकर्‍यांकडून खा.गोडसेंचा सन्मान

jalgaon-digital
1 Min Read

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

पाथर्डी, दाढेगाव, पिंपळगाव खांब, वडनेर दुमाला व विहितगाव या पाच गावातील शेकडो शेतकर्‍यांच्या हजारो एकर जमिनीवरचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने खा. हेमंत गोडसे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

एचएएलच्या सीएसआर फंडातून या पाच गावातील वालदेवी नदीवरील साठवण बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याने गेल्या कित्येक दिवसाचा प्रश्न मार्गी लागत आहे.

या कामी शिवसेनेचे देवळाली विधानसभा प्रमुख व मनपाचे नगरसेवक केशव पोरजे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पाचही गावच्या नागरिकांनी काल खा.गोडसे यांच्या संसरी येथील निवासस्थानी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी नगरसेवक पोरजे व सुदाम ढेमसे यांनी केंद्र शासनाकडून सर्व प्रकारचे निधी स्थगित करण्यात आलेले असताना खा.गोडसे यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले गेले. यावेळी उत्तमराव कोठुळे, गणेश जाधव, पोपटराव कोठुळे, गणपतराव कोठुळे, कैलास हांडोरे, बाळू कोठुळे, ज्ञानेश्वर हांडोरे, तुळशीराम पोरजे, दत्तू पाळदे, भास्कर पोरजे, त्र्यंबक पोरजे, निलेश कर्डिले, त्रंबक कोंबडे, धनाजी गवळी, संजय ढेमसे, जगदीश ढेमसे, संदीप ढेमसे, गंगाधर गवळी, विक्रम गवळी, उत्तम जाधव, शिवाजी जाधव, सदाशिव जाधव, प्रकाश जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *