अहमदनगर | Ahmednagar
फेब्रुवारी ते मे,2020 या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्याने बाधित शेतकर्यांना मदत वाटप
- Advertisement -
करण्यासाठी दोनशे सत्तेचाळीस कोटी शहात्तर लक्ष बावन्न हजार रूपयांचा निधी विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. यात नगर जिल्ह्यातील बाधित शेतकर्यांना 4 कोटी 28 लाख 23 हजार रूपयांचा समावेश आहे.
या कालावधीत नगर जिल्ह्यात 2709 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकर्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. यामुळे बाधित शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.