Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशशेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातून 4 हजार शेतकरी जाणार दिल्लीला

शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातून 4 हजार शेतकरी जाणार दिल्लीला

मुंबई –

नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून सुमारे

- Advertisement -

4 हजार शेतकरी बाईक रॅलीद्वारे दिल्लीला जाणार आहेत. नाशिक ते दिल्ली असा हा दुचाकी मोर्चा असणार आहे.

राजधानी दिल्लीत आंदोलनाला बसलेल्या शेतकर्‍यांना राज्यातील 21 जिल्ह्यांतील शेतकर्‍यांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे सर्व शेतकरी ऑल इंडिया शेतकरी सभेफच्या बॅनरखाली बाईक रॅलिद्वारे दिल्लीला जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे, पालघर, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांचा समावेश आहे.

राज्यातील शेतकर्‍यांच्या या बाईक रॅलीमध्ये 250 दुचाक्यांचा समावेश असून 1,266 किमी अंतर पार करण्यासाठी त्यांना चार दिवस लागणार आहेत. यासाठी त्यांना मध्य प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये ओलांडावी लागणार आहेत.

ऑल इंडिया शेतकरी सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी या बाईक रॅलीची घोषणा केली होती. ते म्हणाले, याद्वारे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा कृषी विधेयकांना विरोध असल्याचे दाखवण्यात येणार आहे. तसेच जोपर्यंत आम्ही आमचे ध्येय साध्य करत नाही तोपर्यंत परत राज्यात परतणार नाही. दरम्यान, बाईक रॅलीवेळी आणि दिल्लीत पोहोचल्यानंतर आम्ही कोविड-19च्या नियमांचे पालन करु आणि पूर्ण काळजी घेऊ असेही नवले यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या