Thursday, April 25, 2024
Homeनगरशेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

शेततळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

शहरात राहणारे दोन परप्रांतीय तरुणांना शेत तलाव पाहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्यात पडून आपला जीव गमवावा लागण्याची दुःखद घटना श्रीगोंदा शहरात सोमवारी दुपारी आनंदकर मळ्यात घडली आहे.

- Advertisement -

सुरेंद्रकुमार हारडू (वय 18) व लक्ष्मण ओमनाथ (वय 17) असे शेत तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृत पावलेले दोन तरुण व अजून दोघेजण असे चौघेजण काल आनंदकर मळ्यातील एका शेततळ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते. सेल्फीसाठी पोझ देत असताना यातील एका तरुणाचा तोल जाऊन तो शेततळ्यात पडला.

त्याला वाचवण्यासाठी दुसर्‍या तरुणाने शेततळ्यात उडी मारली. परंतु ते दोघेही तळ्यात बुडाले वर उभ्या असणार्‍या तरुणांनी आरडाओरडा केला. लोक जमा झाले परंतु तोपर्यंत या दोघांनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी हवालदार पी.सी.शिरसाठ यांनी भेट दिली. मयत झालेले दोन्ही तरुण हे परप्रांतीय असून ते फर्निचर बनवण्याचे काम करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या