सिंधुदुर्ग –
देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आणखी एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने
- Advertisement -
बदलला आहे. घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात केली आहे. दरम्यान, तत्कालीन फडणवीस सरकारने घर बांधणीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेतले होत. टाऊन प्लानिंगकडे (जिल्हा स्तरावर) हे अधिकार देण्यात आले होते. मात्र, या निर्णयामुळे ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींचाही या निर्णयाला कडाडून विरोध होता. दरम्यान, राज्यामध्ये सत्ता पालटल्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेले अनेक निर्णय रद्द करण्यात आले आहेत.