Sunday, May 5, 2024
Homeनाशिकउत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर : खा. गोडसे

उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर : खा. गोडसे

देवळाली कॅम्प । प्रतिनिधी Devlali Camp

महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या परीक्षांसाठी नाशिक हे परीक्षा केंद्र असले तरी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी येथे केंद्र नाही. यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

- Advertisement -

पुढील वर्षांपासून नाशिक येथे केंद्र सुरु करण्याचे लिखीत पत्र खा.हेमंत गोडसे यांना प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी नाशिक केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन गत महिन्यात खा.गोडसे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रशासनाची भेट घेतली होती.

खा.गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा केंद्रासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आला. पुढील परीक्षेपासून अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेसाठी नाशिक येथे केंद्र सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहसचिव अताडे यांनी कळविले लेखी पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या