Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमनोरंजनातून शैक्षणिक विकास

मनोरंजनातून शैक्षणिक विकास

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मनोरंजनातुन शैक्षणिक विकास हि संकल्पना रूजवण्यासाठी खेड्यातही रेडीओ वाजु लागला आहे. वैतरणा केंद्रात तब्बल ४५१ एफ.एम. रेडीओचे राज्यात प्रथमच विक्रमी वाटप करण्यात आले.

- Advertisement -

करोनोच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्र पुर्णपणे ठप्प झाले असुन आँनलाईन शिक्षण प्रणालीवर भर दिला जात आहे. मात्र, आदिवासी ग्रामीण भागामध्ये नेटवर्क व परिस्थिती नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. मात्र पंकज जाधव मित्रमंडळ व वैतरणा केंद्रातील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रातील ४५१ विद्यार्थ्यांना एफ एम देण्यात आले.

यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळाले असुन महाराष्ट्र राज्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात असा उपक्रम नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत राबवला गेला आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. पंकज जाधव मित्रमंडळ व वैतरणा केंद्रातील शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रातील ४५१ विद्यार्थ्यांना मोफत एफ एम रेडिओ वाटप करण्यात आले.

यावेळी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, समाजकल्याण सभापती सुशिला मेंगाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके,पंचायत समिती सभापती जयाताई कचरे, उपसभापती विमल गाढवे, पंचायत समिती सदस्य कौसाबाई करवंदे,कल्पना हिंदोळे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, चेअरमन नितीन खातळे, सरपंच आशा गिर्हे, उपसरपंच सीमा खातळे, माजी सभापती गणपत वाघ,

सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंधे, प्रा. जालिंदर सावंत, गटशिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी कांबळे, बालविकास प्रकल्पअधिकारी पंडीत वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुराबली देशमुख, विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, अशोक मुंढे आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सामाजिक अंतर नियमाचे पालन करण्यात आल्याने सर्वत्र या कार्यक्रमाचे कौतुक होत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक केंद्रप्रमुख राजेंद्र नांदुरकर यांनी केले तर सुत्रसंचालन रविंद्र चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैतरणा केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले._

करोना काळात आदिवासी दुर्गम भागात शैक्षणिक काम करतांना मोठ्या प्रमाणात अडचणीना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागामध्ये इंटरनेट सुविधा व आर्थिक परिस्थिती मुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत होत्या. वैतरणा केंद्रात एकुण १४ शाळा असुन या प्रत्येक विद्यार्थ्यांना एफ एम डिवाईस उपलब्ध करून दिल्यास शिक्षण सुलभ होऊ शकते.

ही संकल्पना मी माझे जावई पंकज जाधव यांच्याकडे मांडली त्यांनी मला त्यांचे मित्र व जाधव यांनी जवळपास एक लाख पंचवीस हजार व केंद्रातील शिक्षक यांनी चाळीस हजाराची मदत केल्याने वैतरणा केंद्रातीव ४५१ विद्यार्थ्यांना आज जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एफ एम डिवाईस वाटप वैतरणा येथे करण्यात आले. राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात प्रथमच एफ एम वाटप होत असल्याने आनंद होत आहे

. -राजेंद्र नांदुरकर,केंद्र प्रमुख, वैतरणा.

- Advertisment -

ताज्या बातम्या