जळगाव –
मृत्यू प्रमाणपत्रापणे शेतीचा निकाल देण्यासाठी 15 हजारांची लाच मागणार्याा चोपडा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथे पकडले आहे.
- Advertisement -
मृत्यू प्रमाणपत्रासंदर्भात शेतीचा निकाल देण्यासाठी येथील नायब तहसीलदार जितेंद्र मच्छिंद्रनाथ पंजे यांनी तक्रारदाराकडे 15 हजारांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीकक्ष गोपाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने चोपडा तहसील कार्यालयात दुपारी सापळा रचला.