सिन्नर। वार्ताहर Sinnar
तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) येथे आज सायंकाळी वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
वैशाली विजय कवडे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सायंकाळी विजांच्या कडकटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पूर्व भागातील अनेक गावात पावसाने हजेरी लावली होती. रामपूर परिसरातही सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
पाऊस आल्याने वैशाली कवडे या घराच्या अंगणातील लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने वैशाली यांनाही विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले .