धुळे । प्रतिनिधी Dhule
शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी 20 ते 25 कावळे अचानक मरून पडलेत. यापैकी दोन तीन कावळ्यांना कुत्र्यांनी खाल्ल्यामुळे ते ही सुस्त झाले आहेत.
यामुळे हा बर्ड फ्लू तर नाही ना! अशी शंका उपस्थित केली जाते आहे. धुळ्यानजीक मेहेरगाव आणि नंदूरबारातील नवापूर येथे ‘बर्ड फ्लू’ चे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लाखोंच्या संख्येने पक्षी नष्ट केले जात आहे. यामुळे सगळी कडे भीती व्यक्त होत असताना आज जिल्हा न्यायालयात कावळ्यांच्या मृत्यूने शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित विभागाने यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, अशीही मागणी होते आहे.