विनापरवानगी मोटर सायकल रॅली काढणाऱ्या १०० जणांवर गुन्हा दाखल

जामनेर – jamner

शासनाने परवानगी नाकारूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनापरवानगी मोटर सायकल रॅली काढल्याबद्दल शहरातील शंभर जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर न ठेवता संसर्ग विषाणूचा प्रसार होईल व मानवी जीवितास धोकादायक असे हयगायीचे कृत्य केल्याप्रकरणी पोलीस नाईक सुनिल अर्जुन माळी यांच्या फिर्यादीवरून राहुल दत्तात्रय चव्हाण ,सचिन संतोष बोरसे, अविनाश लक्ष्मण बोरसे, आकाश पांडुरंग बंडे,गोपाल रामदास बरकले,दिपक शंकर राजपूत,दिपक आत्‍माराम माळी, धनराज माळी,दिपक खाटीक,सचिन चौधरी सर्व राहणार जामनेर यांच्यासह शंभर जणांविरुद्ध गु.र.न.४८/ २०२१ भा.द.वि.कलम १८८, २६९, २७० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) चे उल्लघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *