अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
2019 हे वर्ष करोना टाळेबंदीत गेले. त्यामुळे नगर मनपा नगरसेवकांना प्रभागात विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही.
यामुळे सर्व नगरसेवकांना प्रभागातील नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.प्रशासनाने शास्ती माफीची घोषणा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात कर वसुली झाली आहे. आता सर्व नगरसेवकांना आपापल्या प्रभागात विकासासाठी प्रत्येकी 20 लाखांचा निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शास्ती माफीची मुदत डिसेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांचेकडे केली आहे.
याबाबत आयुक्तांशी चर्चा करताना शिवसेनेचे माजी शहरप्रमुख कदम म्हणाले, सत्ताधार्यांकडून सेना नगरसेवकांना निधीच्या बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांना विकास कामांसाठी समान निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही कदम यांनी यावेळी दिली.
निवेदनावर शिवसेना गटनेत्या रोहिणी शेंडगे, नगरसेविका सुवर्णा गेनाप्पा, दत्तात्रय कावरे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, विद्या खैरे, प्रशांत गायकवाड, उमेश कवडे, बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, शांताबाई शिंदे, सुनीता कोतकर, कमल सप्रे, मदन आढाव, अशोक बडे, रिता भाकरे, सुरेखा कदम, मंगल लोखंडे, सुभाष लोंढे, सुवर्णा जाधव यांच्या सह्या आहेत.