Friday, April 26, 2024
Homeनगरअहमदनगर : करोनाने घेतले सहा हजार बळी !

अहमदनगर : करोनाने घेतले सहा हजार बळी !

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar – जिल्ह्यातील करोना बळींची सहा हजारांच्या पुढे गेली आहे. करोना पोर्टल बुधवारी आतापर्यंत करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 6 हजार 7 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल 420 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 538 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 975 इतकी झाली आहे.

जिल्ह्यात करोनावर मात केलेल्यांची संख्या आता 2 लाख 77 हजार 419 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 96.86 टक्के इतके झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 74, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 117 आणि अँटीजेन चाचणीत 347 रुग्ण बाधीत आढळले.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 14, नगर ग्रामीण 4, नेवासा 3, पारनेर 17, पाथर्डी 17, राहुरी 2, संगमनेर 14, श्रीरामपूर 1 आणि कँटोन्मेंट बोर्ड 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 9, अकोले 2, जामखेड 5, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 11, नेवासा 1, पारनेर 11, पाथर्डी 4, राहता 15, राहुरी 2, संगमनेर 33, शेवगाव 1, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 3 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 347 जण बाधित आढळुन आले. मनपा 4, अकोले 23, जामखेड 11, कर्जत 39, कोपरगाव 10, नगर ग्रामीण 10, नेवासा 8, पारनेर 50, पाथर्डी 50, राहता 2, राहुरी 6, संगमनेर 68, शेवगाव 22, श्रीगोंदा 42, श्रीरामपूर 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या