लॉकडाउनसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले…

jalgaon-digital
1 Min Read

राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनचा इशारा दिला आहे. यासंदर्भात येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये जाऊन कोरोनाची लस घेतली. लस घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना महाराष्ट्रातील जनतेनेही कोरोनाची लस घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पण, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढत राहिली तर जिथे गरजेचा वाटेल त्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *